Posts

Showing posts from 2021
 चौथ्या नवतेच्या चार  कादंबऱ्या इंट्रो श्रीधर तिळवे नाईक  अडाहॉकाबानासुना आल्यानंतर काहींनी  विचारलं होतं इतकंच ? नुसत्या एका कादंबरीनं काय होतं ? मी म्हणालो होतो मी नुसती ओपनिंग करून देतोय पुढच्या खऱ्या खेळ्या पुढची पिढी खेळेल आणि आता चार कादंबऱ्या स्पष्टपणे आलेल्या दिसतायत (विश्राम गुप्तेच्या कादंबरीवर मी आधीच बोललो आहे त्यामुळे तिचा विचार मी इथे करत नाहीये ) नितीन वाघ ह्यांची व्हर्जिन  सुधीर देवरेंची मी गोष्टीत मावत नाही  प्रणव सखदेवची मेट्रोमॉल  अविनाश उषा वसंताची पटेली  ह्यातील सुधीरची कादंबरी अनपेक्षितपणे आली कारण तो ज्या अहिराणीच्या संदर्भात काम करतोय तिच्यातून तो असं काही लिहिल हे अनपेक्षित होतं . नितिनकडून तो भेटल्यापासूनच अपेक्षा होत्या प्रणव मात्र थेट फेसबुकवर (आम्ही अजून एकदाही भेटलेलो नाही ) त्यामुळं माहिती न्हवतं अविनाश कादंबरीकडे आस्तेकदम सरकेलच अशी अपेक्षा होती कारण त्याच्या कविता मी वाचल्या होत्या आणि त्याच्या कवितेच्या भाषेतच पटेलीच्या भाषेची शक्यता स्पष्ट दिसत होती  ह्या चारही कादंबऱ्या अल्टर्नेटीव्ह व्हिजन घेऊन येतात नितीन सेलेबिलिटीची , सुधीर गोष्टीची , प्रणव मॉलची
 कोल्हापूर व पाया पडणे वैग्रे  Alka Gandhi-Aserkar कोल्हापूर - स्त्रियांसाठी फार प्रतिगामी विचार असणारं शहर?? 20 एक वर्षांपूर्वी गेले होते. ज्यांच्याकडे गेले होते त्या घरातील बायका माझ्याच वयाच्या, डोक्यावर पदर घेऊन राबत होत्या.. नि नवऱ्याच्या पायावर रीतसर डोकं ठेवून पाया पडत होत्या.. नवरे इंजेनीअर होते. श्रीधर तिळवे नाईक  प्रथम धन्यवाद ! प्रत्येक विकसनशील शहराप्रमाणे १९८५ला कोल्हापुरवर सरंजामशाहीचा पगडा होता त्यावेळी लिहिलेली ही कविता आहे मात्र कोल्हापूरातही ह्याकाळात आधुनिक विचार करणारे लोक होते व आहेत मात्र ते अल्पसंख्य आहेत पुणे मुंबईतही ह्या काळात किती आधुनिक लोक होते हा संशोधनाचा विषय आहे युरोपअमेरिकेतही प्रबोधनाचा प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाही आजही तिथे शाळेत न गेलेल्या स्त्रिया आहेत प्रश्न प्रमाणाचा असतो आपल्याकडे पुरोगामी लोकांचे प्रमाण धड २० टक्केही नाही आधुनिक म्हणावेत असे ५ टक्केही नाहीत आणि उत्तराधुनिक १ टक्काही नाहीत  प्रत्येक संस्कृतीत आदर व्यक्त करण्याच्या पद्धती असतात आपल्याकडे चरणस्पर्श ही आदर दाखवण्याची पद्धत आहे मी स्वतः माझ्या आईवडिलांना आणि माझ्या दोन्ही बहिणींना मा
 देशीयतेचे कार्य काय श्रीधर तिळवे नाईक  साठोत्तरीचा ज्वर अद्यापही ओसरलेला नाही आपण ज्या संस्कृतीत चाललोय त्यापेक्षा आपण ज्या संस्कृतीत होतो  त्यातच प्रत्येकाला रस ! बरं स्वतः भूतकाळात रमणाऱ्या ह्या लोकांचा तेच काम करणाऱ्या हिंदुत्ववादाला विरोध असतो कारण काय तर ह्यांना परंपरेत काही आधुनिक लोक व विचार सापडत असतात समजा असे लोक तुमच्या परंपरेत नसते तर तुम्ही हिंदुत्ववाद्यांचं काय केलं असतं ? आमच्या परंपरेत हिंदुत्ववाद्यांना विरोध नाही म्हणून गप्प बसला असता कि परंपरा मोडीत काढली असती ? नवतेचा आधार परंपरा असत नाही नवतेचा आधार वर्तमान व भविष्य असते तुम्ही नवतेला पारंपरिक आधार शोधायला लागला कि आपोआपच जे परंपरावादी लोक असतात ज्यांना आधुनिकता किंवा चौथी नवता नको असते ते तुमच्या वळचणीला येऊन उभे राहतात आणि मग तुम्ही परंपरेला बळ देता देता कर्मठपणाला बळ द्यायला लागता रामाचं समर्थन अंतिमतः बजरंग दलाचं समर्थन बनतं आणि परंपरेचा देशीवादी पद्धतीने विचार करणारे लोक कितीही आधुनिक असले तरी ते अल्पसंख्याक असल्याने परंपरेचा अंतिम लढा हा कर्मठ लोकांच्या ताब्यात जातो अंतिमतः हिंदू कादंबरी हिंदुत्ववादाला मदत कर
Image
आंतरराष्ट्रीय, जागतिक आणि वैश्विक श्रीधर तिळवे नाईक  मला वाटतंय जागतिक  आणि आंतरराष्ट्रीय ह्यात तुमची काहीतरी गल्लत होतीये देशी भाषेतील पुस्तक भाषांतरामार्गे जागतिक होऊ शकते पण सॅम्युएल बेकेटसारखा लेखक आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लंड आयर्लंड आणि फ्रांस अशा तीन राष्ट्रातल्या लोकांसाठी लिहीत होता व्ही एस नॉयपॉल व सलमान रश्दीसाठी अनेक राष्ट्रातील ऑडियन्स डोक्यात असावा असे वाटते बाकी वैज्ञानिक तंत्रवैज्ञानिक चिन्हवैज्ञानिक चिन्हतंत्रवैज्ञानिक लेखक तर  उघड उघड आंतरराष्ट्रीय वाचकांसाठी लिहीत असतात केवळ साहित्यासाठी कोण समग्र संस्कृतीला देशीवादी वेठीस  धरेल ? खुद्द नेमाडे बदलतायत हे अलीकडच्या त्यांच्या गोष्टींच्यावरून दिसते नितीन , असं होऊ नये कि नेमाडे नूतन झालेत आणि तुम्ही जुन्या नेमाडेंच्यात थांबलाय .  पहिली गोष्ट तीन कॅटेगरीज  १ वैश्विक  २ जागतिक  ३ आंतरराष्ट्रीय अंतर्राष्ट्रीयमध्ये सगळी राष्ट्रे अभिप्रेत नाहीत दोन राष्ट्रातील वाटाघाटींनाही आंतरराष्ट्रीय वाटाघाटी म्हंटल जातं कम्युनिस्ट पक्षाची अनेक अधिवेशनं आंतरराष्ट्रीय असतात त्यात प्रत्येक राष्ट्र सामावून घेतलं जाईलच असं नाही  जग म्हणजे तु
सॉरी सहमत नाही  मनोहर ओक एक टिपण  श्रीधर तिळवे नाईक  मनोहर ओक ह्यांची एक ओळ आहे  "लेखक कसे सापासारखे  माणुसकीच्या शेपटीवर पाय दिल्यावर दंश करणारे "  ह्या ओळी दिसायला साध्या दिसतात आणि लेखकही त्यामुळे खुश होतात पण त्यातले खरे अर्थसौंदर्य लेखक मध्ये नाहीये ते आहे माणुसकीला दिलेल्या सापाच्या उपमेत अशी उपमा मन्यालाच सुचू शकते वास्तविक माणुसकी म्हणजे कशी छानछान दुधासारखी पांढरी तुपासारखी मुलायम असायला हवी ह्या ओळीत असे होत नाही ती चक्क सापासारखी होते मानवतावादी लोकांनी काढलेल्या माणुसकीबद्दलच्या मुलायम गळ्यापेक्षा इथे चक्क माणुसकीचा फुत्कार ऐकायला मिळतो ह्यात लेखकाचा गौरव जास्त आहे कि सापाचा  हे ठरवणे कठीण आहे मात्र माणुसकी म्हणजे शामळुपणा हे समीकरण मन्या मोडीत काढतो हे नक्की ! श्रीधर तिळवे नाईक 
 आशुतोष दिवाण ह्यांच्या कमेंटवर भाष्य श्रीधर तिळवे नाईक  आशुतोष दिवाण ह्यांनी एक कमेंट केलीये तिला मी इथे उत्तर देतो आहे  प्रिय आशुतोष दिवाणजी  सर्वात प्रथम धन्यवाद ! तुम्ही म्हणताय, "आपण आणि मकरंद साठे या दोघांबद्दल मला आज मराठीत बहुदा सर्वात जास्त आदर आहे हे मी अनेकदा लिहीले आहे". श्रीधर तिळवे :मकरंद साठे ह्यांच्याबद्दल मलाही आदर आहे स्वतःचा मध्यमवर्ग झाकण्यापेक्षा तो खोलून ठेवण्यात अधिक अर्थ आहे हे कळलेल्या दुर्मिळ लेखकांपैकी ते एक आहेत मुख्य म्हणजे श्याम मनोहरांची उगाचची अगतिकता त्यांच्या पात्रांच्या ठायी नाही नवमध्यमवर्गाच्या  आंतरिक लालसा आणि त्यांच्यातील साधनशुचितेचा होत चाललेला ऱ्हास  ते प्रभावीपणे मांडतात असो  तुम्ही म्हणताय,  "पण आपल्या अश्या कविता वाचल्या की मला काही समजेनासे होते". श्रीधर तिळवे नाईक : अश्या म्हणजे कश्या ? तश्या म्हणजे कश्या ?आणि तश्या का आवडतात आणि अश्या का आवडत नाहीत  तुम्ही म्हणताय,  "एक भयंकर मोठा समाज भयंकर इंटेन्सली पोट भरण्यासाठी,आपले जीवन सुधारण्यासाठी इरेला पडून धडपडत आहे.खूप मोठ्या प्रमाणावर तोंडाने बोलत नसला तरी आपल्या व्य
 अब्सर्ड कविता  प्रबोधनात्मक युगाचा औद्योगिक क्रांतीने अंत करायला सुरवात केली आणि मानवी इतिहासातला आधुनिक टप्पा सुरु झाला ह्या आधुनिकतेचे व्यक्तिगत आविष्कृत रूप म्हणजे अस्तित्ववाद ! अस्तित्ववादाचे सात टप्पे आहेत  १ आदि अस्तित्ववाद हा प्रामुख्याने सोरेन किर्केगार्द व फ्रेडरिक नित्शे ह्यांनी मांडला अस्तित्ववादाच्या सर्व मूळ थीम्स ह्या दोघांनी शोधल्या मराठी साहित्यावर ह्या दोघांचा प्रचंड प्रभाव आहे किंबहुना आधुनिक युगाचे पाच तत्वज्ञ निवडले तर त्यात ह्या दोघांचा समावेश करावाच लागतो इतके ह्या दोघांचे कार्य महत्वाचे आहे ह्यातील किर्केगार्दच्या प्रभावामुळेच इब्सेन इब्सेन बनला  २ मानसघटित अस्तित्ववाद हा एडमंड हुसेर्ल ने मांडला ह्याने हेतुगर्भतेचे इंटेन्शनलिटीचे तत्वज्ञान मांडले प्रत्येक मानवी कृती ही हेतू ठेऊन जन्मते आपले ज्ञानही हेतुग्रस्त असते अशी त्याची मांडणी पुढे अनसर्टन्टीच्या तत्वज्ञानाला जन्म देणारी ठरली हुसेर्लने भूमितीच्या तत्वज्ञानाची जी मांडणी केली तिचा थेट प्रभाव जॅकस देरिदावर आहे  ३ मनोविश्लेषणात्मक अस्तित्ववाद हा जास्पर्स व सिगमंड फ्रॉइड ह्यांनी मांडला  ४ नवअस्तित्ववाद हा प्रथम
 अर्बन लिरिकॅलीटीच्या शोधात  श्रीधर तिळवे नाईक  गीतात्मकता (लिरिकॅलीटी)ही कवितेतली एक अपरिहार्य गोष्ट आहे आणि अक्षरवृत्त आणि मात्रावृत्तात लिहिणाऱ्या लोकांना ती माहित असतेच मात्र प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा तुमचा एथॉस अरबन असतो सुदैवाने ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुरवातीलाच सापडले -स्वच्छन्द आणि अर्बन स्लॅन्ग ! माझा कवितेचा झटका तेव्हाही एका फ्लो मध्ये वीस पंचवीस कविता लिहणारा होता आणि अर्बन लिरिकॅलीटीबाबत हेच घडले  चालले आहे xx माझे कुमारीशी xx भोग करायला बहरून  तुमची काही नैतिक हरकत बाप म्हणून बाप म्हणून  अशी सुरवात होऊन ही अर्बन लिरिकॅलीटी सुरु झाली आणि  कर डिस्को  हो फियास्को  कुठले न बंधन काचू दे  देह अवघा नाचू दे  अशी रचना करत ती संपली ह्यातील चालले आहे एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार मध्ये आहे तर कर डिस्को डेकॅथलॉन मध्ये ! कोल्हापुरी स्लॅन्गचा वापर अटळ होता तो झाला काही गझलांच्यातही अर्बन लिरिकॅलीटी मेंटेन झाली आता ह्या कवितांच्याकडे बघताना जाणवते कि चालले आहे ही लॉन्ग ओळींची तर कर डिस्को शॉर्ट ओळींची आहे चालले आहे ला माझ्या बापाने केलेल्या मनाईची पार्श्वभूमी आहे तर कर डिस
स्टेटस , फूटपट्ट्या आणि जगणे १ श्रीधर तिळवे नाईक  आपण कशासाठी जगतो का जगतो कुणासाठी जगतो काय जगतो केव्हा जगतो हे प्रश्न कायमच माणसाचा पाठलाग करत असतात त्यातूनच माणसाने स्वतःचे मूल्यमापन स्वतःच्या व्हॅल्यू व स्टॅन्डर्डनं करावं कि इतरांनी दिलेल्या फूटपट्ट्या वापराव्यात ? हे प्रश्न निर्माण होतात व स्वमूल्यमापनाचाही  प्रश्न निर्माण होतो व  माणसाच्या आयुष्यातला एक महत्वाचा प्रश्न बनतो  जगण्याचे चारच प्रकार असतात  मोक्षिक : ह्या प्रकारात तुम्ही फूटपट्ट्या फाट्यावर मारून फूटपट्ट्या नाकारून जगता  आत्मिक : जिथे तुम्ही स्वतःच्या फुटपट्ट्यानी जगता  आर्थिक : जिथे तुम्ही समाजाच्या फुटपट्ट्यानी जगता  कामिक : जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या फुटपट्ट्यांप्रमाणे स्टॅण्डर्डप्रमाणे जगता  फूटपट्ट्या म्हणजे तुमचे फूट कुठे उभे आहेत कुठल्या मूल्यात उभे आहेत त्याची पट्टी म्हणजे इलाका म्हणजे क्षेत्र ! ही पट्टी हे क्षेत्र आपल्या अंतःकरणात तयार होत असते वावरत असते ते स्थावर आणि जंगम असे दोन्ही असते आपण आपला मोबाईल कॅरी करावा तसे हे क्षेत्र ही पट्टी कॅरी करत असतो आपली कुठल्याही विषयाबाबतची पोझिशन त्यामुळे प्रज्वल
रोमँटिसिझमचे वाकपुरुष ते वावदूकपुरुष श्रीधर तिळवे नाईक  सुभाष अवचट , खानोलकर , जी ए , पु ल हे सगळेच मिडलक्लास रोमँटिसिझममध्ये वावरत असतात वा होते भावनाविलास आणि किस्सेगिरी ह्यातुन हिरोगिरी प्रकट करण्याची दांडगी हौस हीही ह्या रोमँटिसिझमची वैशिष्ट्ये ! मेलोड्रामा हा कणा आणि कधीकधी तो क्रिएट करण्याच्या नादात वास्तवाला काल्पनिक डगला चढवणे हेही अटळ ! ह्याहून काही वेगळी अपेक्षा मला तरी न्हवती लेखकाचं प्रत्यक्ष दारिद्र्य आणि त्याच्या लिखाणातील कल्पनाश्रीमंती ह्यांच्यातले ताणेबाणे आपण सादर करतोय अशा कैफात झालेला हा लेख आहे प्रयत्न हिरो बनवायचा होता तो फसला  आणि वाद निर्माण झाला  रोमँटिसिझमने अर्वाचीन फॅमिली केंद्रस्थानी आणून शेक्सपियरच्या राजेशाही फॅमिलीला छेद दिला खरा पण मध्ययुगीन स्वप्नविभोर माहोलमधून त्याची सुटका  झाली नाही इमोशनल लटके आणि झटके ह्यावर तो तगला खरा पण हळूहळू त्यातले नावीन्य संपले मराठीत ही इंतेहा ८० लाच झाली अशावेळी २०२१ साली ही मेन्टॅलिटी सदर म्हणून सादर करायची म्हणजे एकता कपूरला फिलॉसॉफर म्हणून नेमणे आहे असो कुबेरांची कुबेरगिरी ही अशी एटीच्या एटीकेटमध्ये कधीकधी अडकत असते आप
 शंकर सारडा :चौथ्या नवतेला प्रोत्साहन देणारा पहिला ज्येष्ठ समीक्षक  नव्यांची अक्षर चळवळीत माझा लेख आला आणि सगळीकडून टीका सुरु झाली ही चौथ्या नवतेच्या चळवळीची जाहीर सुरवात होती जे आतापर्यंत पर्सनल होते ते आता पब्लिकमध्ये आले अरुण म्हात्रेने लेख छापला पण विरोधही केला हा विरोध पुढे दैनिक सकाळमध्ये प्रसिद्धही झाला त्यावेळी  नव्यांची अक्षर चळवळ हा एक नव्या कवींना मोठाच आधार होता आणि नेमका तोच चौथ्या नवतेच्या चळवळीला पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट झाले म सु पाटलांनी अनुष्टुभच्यावतीने आधीच नकार दिला होता सत्यकथा बंद पडली होती आणि अनियतकालिकांच्या चळवळीने दम तोडला होता अशावेळी आता आपणच हातपाय हलवायला हवे हे स्पष्ट झाले आणि मी सौष्ठव नावाचे अनियत्कालिक सुरु करायचे निश्चित केले भालचंद्र कुबल ह्या माझ्या परममित्राने ह्या निर्णयाला केवळ पाठिंबा दिला नाही तर अंकाची प्रकाशक म्हणून जबाबदारी स्वीकारली आशुतोष आपटे , संतोष क्षीरसागर (हा आता जेजेचा डीन झालाय ) ह्यासारखे जेजेईट व मंगेश बनसोड  आल्हाद भावसार महेश म्हात्रे ह्यांच्यासारखे हॉस्टेलाईट जॉईन झाले पुढे कालनिर्णयच्या (बहुधा जयराज) साळगावकरांनी अंक छा
कवींनी गद्य वाचावे श्रीधर तिळवे नाईक  जगाचा वाङ्मयीन इतिहास एक गोष्ट नेहमीच सांगत आलाय ती म्हणजे कुठल्याही नवतेची सुरवात प्रथम ज्ञानाच्या क्षेत्रात होते मग साहित्यात ती प्रथम कवितेत प्रकट होते मग कथेत मग चित्रशिल्पकलेत मग कादंबरी नाटकात मग सिनेमा टीव्ही वेबमधे  साहित्याच्या क्षेत्रात एखादी नवता कवितेत अवतरल्यावर नंतरच्या कविंच्याकडून एक साधी अपेक्षा असते कि त्यांनी आधी ती नवता पचवावी पण अनेकदा असे होत नाही आमच्या पिढीने साठोत्तरी देशी नवता पचवणे आवश्यक होते बहुतांश लोकांनी हे न करता साठोत्तरीचा देशीवादी हिंदू नवबौद्ध हमरस्ता पकडला  भालचंद्र नेमाडे अरुण कोलटकर नामदेव ढसाळ दिलीप चित्रे रघु दंडवते ह्यांनी ती निर्माण केली  ,राजन गवस , रंगनाथ पाठारे श्याम मनोहर वृंदावन दंडवते ह्या सारख्या लोकांनी कादंबरीनाटकात ही देशी नवता विस्तारली  समांतर केली आणि सदानंद देशमुख इंद्रजीत भालेराव आसाराम लोमटे कृष्णान खोत ह्वैग्रेंनी ती प्रस्थापित केली  प्रॉब्लेम तेव्हा निर्माण झाला जेव्हा कादंबरीत आलेला आशय काही कवींनी कवितेतून प्रकट करायला सुरवात केली आता ज्यांनी गद्य वाचले आहे त्यांना ह्यात काय रस येणार ?
 यशवंत मनोहर आणि सरस्वती श्रीधर तिळवे नाईक  उथ्यानगुंफा हा माझ्या कॉलेजजीवनातला एक आवडता काव्यसंग्रह कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही ही त्यातली गाजलेली ओळ पु ल देशपांडेंच्या लेखामुळे ती अधिकच सर्वत्र पसरली त्यातला लखलखाट पुढे डेव्हलप झाला नाही कदाचित जीवनायन अपवाद आंबेड्करांच्यावर नामदेव ढसाळ ह्यांनी असं काही जबरदस्त लिहून ठेवलंय कि त्याच्या आसपासही कोणी जाऊच शकत नाही यशवंत मनोहर त्याला अपवाद नाही त्यामुळे त्यानंतरचे यशवंत मनोहर हे तितकेसे अपील नाही झाले सौंदर्यशास्त्रावरचे त्यांचे लेखन नक्कीच दखलपात्र विशेषतः मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्राची त्यांनी केलेली उलटतपासणी सौंदर्यशास्त्रावर लिखाण करणारा दलित हा ब्राह्मणी असतो अशी गैरसमजूत असणाऱ्या दलितांच्यात त्यांना ब्राम्हणी समजणारे काही महाभाग असावेत  साठोत्तरी फुलेआंबेडकरवाद दोन  मार्गाने जातो  फुलेकेंद्री फुलेआंबेडकरवाद  आंबेड्करकेंद्री फुलेआंबेडकरवाद  यशवंत मनोहर हे दुसऱ्या मार्गाने गेलेले ! फुले आंबेडकरवादाची त्यांनी केलेली आंबेड्करकेंद्री मांडणी सातत्याने पुढे आलेली !  नामदेव ढसाळने कवितेत अनेकांना खुजे करून टाकले त्यात एक यशवंत मनो