Posts

Showing posts from 2018
चिन्हसृष्टीकरण आणि स्थानिकता चिन्हसृष्टीकरणाचा जागतिक कालखंडाचा काळ अद्याप संपलेला नसला तरी आज ना उद्या तो संपणे अटळ आहे विशेषतः कलेच्या संदर्भात . हा काळ सृजनात्मक गर्दीचा काळ आहे आणि त्यामुळेच एडिटर ची गरज आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत आहे कि रसिक गुदमरून जावा साधा इतिहास लिहायला जावा तर काळ आणि अवकाश ह्यांच्या विविधतेचा एव्हढा प्रचंड भडीमार होत आहे कि केवळ डाटा बघून हबकून जायला होते साध्या मराठी आदिवासी संस्कृतीचा अभ्यास किंवा महारांचा वा कोकणस्थ ब्राम्हणांचा अभ्यास करायला जावा तर प्रचंड डाटा उपलब्ध आहे . म्हणजे इथे अवकाशातील केवळ एक जात निवडली तरी संशोधनातील चार वर्षे सहज जावीत साहजिकच जगातील कोकणस्थ ब्राम्हण वैग्रे तर आणखी कठीण हा जो डाटाचा महासागर आपल्यावर आदळतोय त्याचं करायचं काय ? मी ह्यावर शोधलेला उपाय म्हणजे अवकाशाबाबत नागेशी बांदिवडे हे गाव कोल्हापूर हे माझे शहर आणि मुंबई ही महानगरी ही घालून घेतलेली मर्यादा काळाबाबत इसवीसनपूर्व ५००० ते आत्ताचा काळ , दर्शनाबाबत शैव , विचारप्रणालीबाबत विवेकानंद , शिवाजी , बसवेश्वर , फुले , गांधी , आंबेडकर आणि विरोधी पक्ष म्हणून
सागर तळाशीकर दुराव्यातून जिव्हाळ्याकडे श्रीधर तिळवे नाईक सागरची आणि माझी पहिली भेट नेमकी कधी झाली हे आता आठवणं कठीण आहे इतकी ती जुनी आहे भेटल्यापासून हे नाते अंतर ठेवून जिव्हाळा राखणे ह्या कॅटेगरीतील आहे ह्याला आम्ही दोघेही जबाबदार आहोत माझी स्वतःची जीवनशैली म्हणजे जो ज्या समूहातील आहे त्याला त्या समूहाच्या अंगाने भेटणे कविंना कवी म्हणून संन्याश्यांना संन्याशी म्हणून शैवांना शैवाचार्य म्हणून इतिहासकारांना इतिहासकार म्हणून भविष्यावैज्ञानिकांना भविष्यावैज्ञानिक म्हणून ज्योतिष्यांना ज्योतिषी म्हणून समाजशास्त्रज्ञांना समाजशास्त्री म्हणून फिल्म नाटकवाल्यांना फिल्म नाटकवाला म्हणून ! सागर मला भेटला तो नाटकवाला म्हणून ! साहजिकच आमच्या भेटी नाटक , सिरीयल आणि फिल्मच्या पार्श्वभूमीवरच होत राहिल्या तो सुरवातीला एक मितभाषी , माझ्या तथाकथित सिनियॉरिटीचा आदर ठेवणारा म्हणून भेटत असला तरी लवकरच आमची भेट मित्र म्हणून व्हायला लागली त्याने त्यावेळी आंतरमहाविद्यालयीन नाट्यकात काम करायला सुरवात केली होती आणि तो लॉचे शिक्षण घेत होता त्यावेळीही  तो स्वतःचे लाईफ कधीच उघड्यावर आणायचा नाही किंवा त्याचे
प्रत्यय , शरद भुताडिया आणि कोपेनहेगेन ३ श्रीधर तिळवे नाईक कोपेनहेगेन माझ्या आयुष्यात मी इतिहासाचा अभ्यास पाच वेळा केला प्रथम शैवाचार्य म्हणून  भारतीय दर्शनाच्या संदर्भात मग बीएला इतिहास हा माझा मुख्य विषय होता तेव्हा जागतिक इतिहासापासून महाराष्ट्राच्या इतिहासापर्यंत वैज्ञानिक पद्धतीने पुढे पीएचडीला प्रायोगिक रंगभूमीचा अभ्यास करतांना  सरंचनावाद उत्तरसंरचनावाद आणि पोस्टमॉडर्निज्मच्या संदर्भात ,  चौथ्यांदा जेव्हा जेएनयूला पेपर सादर केल्यानंतर शैव पॅरॅडाईम्स आणि युरोपियन पॅरॅडाईम्स हा इतिहासविषयीचा  ग्रंथ सिद्ध केला तेव्हा पुन्हा शैव पद्धतीने आणि पाचव्यांदा जेव्हा थिएटर अकॅडमीत सगळे इजम शिकवायची जबाबदारी मंगेशने टाकली तेव्हा थिएट्रिकल संदर्भात  ! कोपेनहेगेन ट्क्करले ते चौथ्या इतिहासाच्या अभ्यासावेळी ज्यांना कॉन्टिनेन्टल फिलॉसॉफी माहित आहे त्यांना  जर्मन आणि डेन आयडेन्टीटीचे प्रश्न माहित आहेत त्यांना कोपेनहेगेनला टक्करावेच लागते वास्तविक इंग्लिश जर्मन आणि डेन तिन्हीही जर्मनीक तरीही त्यांच्यातले पेच इतिहासकारांना आव्हान देणारे ! ऍटोमिक संरचनेचे रुदरफोर्ड मॉडेल , बोहर मॉडेल आणि नंतरचे आईझ
प्रत्यय ,शरद भुताडिया आणि कोपेनहेगेन २  शरद भुताडिया आणि आत्मनिष्ठ अभिनयघराणे श्रीधर तिळवे नाईक संगीताची जशी स्पष्ट घराणी असतात तशी अभिनयाचीही घराणी असतात एक शैवाचार्य म्हणून अभिनय शिकणे गरजेचे असल्याने ते शिकताना आणि गेली कित्येक वर्षे अभिनय शिकवताना मी हे सत्य शिकलो आहे शैव परंपरेने अभिनयाचे दोन प्रकार केलेले आहेत १ नाट्यधर्मी वा कलाधर्मी अभिनय २ लोकधर्मी म्हणजे लोकांचे अनुकरण करून करावयाचा अभिनय इंग्लिशमध्ये ज्याला BECOMING म्हणतात त्याला शैव शब्द आहे भव आणि ह्या भवण्याची शक्ती  ती भवानी ! हे भवणे मानवी पार्थिव पातळीवर  भवन भुवन  आणि भव्यता निर्माण करते त्याचा अंतःकरणात्मक व्यवहार व चलनवलन म्हणजे भाव होय अभिनेत्याने त्या त्या सीनप्रमाणे स्वतःला भावांनी संचरित करावयाचे आणि त्या त्या सीननुसार नाट्यधर्मी वा कलाधर्मी किंवा लोकधर्मी अभिनय करावयाचा अशी शैव कल्पना आहे ह्या अभिनयानुसार मग रसिकांच्यात रस निर्माण होतात आणि रसनिष्पती हे कलेचे प्रधान कार्य आहे असे शैव मानतात शैव परंपरेनुसार अभिनयाची दोन घराणी आहेत १ अभिजात घराणे २ लोक घराणे शैव दोन्ही घराणी महत्वाची मानतात आणि अनेकदा
प्रत्यय . शरद भुताडिया आणि कोपेनहेगेन १ परवा आमच्या थिएटर अकॅडमीत कोपेनहेगेन चा अतिशय सुंदर असा प्रयोग झाला आणि कोल्हापूरच्या माझ्या वास्तव्यातील एक मोठा कालखंड झर्र्कन सरकला . हे नाटक व्हावे  अशी मंगेश बनसोड आणि माझी फार इच्छा होती . परिवर्तनवादाला प्रोत्साहन देणारे प्रत्येक नाटक अकॅडेमित झाले पाहिजे ही आम्हा दोघांचीही मनापासून इच्छा आहे आणि मंगेशच्या हातात अकॅडेमिचे नेतृत्व आल्याने हे आता थोडे सोपेही झाले आहे अर्थात मंगेशला हे सोपे जात नाहीये पण तरीही मार्ग काढत तो हे करतो आहे . त्यामुळे प्रथम त्याचे अभिनंदन ! हा प्रयोग झाल्यानंतर आणि मी भुताडियांना सलाम केल्याबद्दल काही प्रश्न निर्माण केले गेलेत  त्याची प्रथम उत्तरे देतो  तू एकेकाळी प्रत्ययला कट्टर विरोध केला होतास कि नाही मग आता हे कौतूक का  ? मी विरोध केला होता  ही वस्तुस्थिती आहे ह्या विरोधाची कारणे वैचारिक होती व आहेत ही कारणे पुढीलप्रमाणे १ माझा मार्क्सवादाला ठाम विरोध होता आणि आहे आणि तो मी कधीही लपवलेला नाही मात्र श्रमांना प्रतिष्ठा देण्यात मार्क्सचा वाटा आहे हे मला मान्य आहे श्रमिकांना न्याय देण्याचा मार्क
दिनकर मनवरांच्या कवितेवरून सध्या सुरु झालेला वाद हा केवळ प्रतिक्रिया नाही तर त्यात अस्मितांच्या बोचक्यात मानवता बांधू पाहणाऱ्या मानसिकतेचा झैलझपाटा आहे त्याचा आदर राखूनही मी म्हणेन कि अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी दिनकर मनवरांना पाठिंबा देणे आवश्यक आहे भारतीय प्रबोधनाचे युग अजून संपलेले नाही किंबहुना त्यातील खरे संघर्ष आता अधिक उफाळून आले आहेत प्रबोधन काय आहे ? प्रबोधनाचा राजकीय प्रोजेक्ट कोणता ? तर हा प्रोजेक्ट आहे नेशन बिल्डिंगचा राष्ट्र निर्माणाचा प्रत्येक व्यक्तीतील साऱ्या अस्मितांचा अंत करून त्याला भारतीय नावाची राष्ट्रीय अस्मिता पुरवण्याचा ! युरोपने प्रथम आपली राष्ट्रे निर्माण करायला सुरवात केली आणि तिथेही अनेक देशांच्या अस्मितेवरून फाळण्या झाल्या आणि स्वातंत्र्यवादी चळवळीही लढल्या गेल्या तिथल्या वांशिक आणि आदिवासी अस्मिता तर राज्यकर्त्यांनी अक्षरशः चिरडल्या आणि ख्रिश्चन धर्माने एकधर्मीयत्व लादून आपल्या आपल्या राजांना प्रचंड मदतच केली भारतात एकधर्मीयत्वाचा अभाव होता आणि तो भरून काढण्यासाठी सावरकरांनी एकंहिन्दुत्ववादी अस्मिता निर्माण केली तर काँग्रेसने सेक्युलर भारतीय अस्मिता !ह्य
कविता महाजन गेल्या !काहीश्या अनपेक्षित ! ऐंशोत्तर पिढीतील एक अतिशय दमदार कादंबरीकार गेली माझ्या संपूर्ण आयुष्यात मी त्यांना फक्त एकदाच भेटलो तेही म सु पाटील ह्यांच्यामुळे रुईया कॉलेजवर त्यांच्या  काव्यसंग्रहावर बोलताना ! आमचे वैयक्तिक संबंध फारसे न्हवते आणि फ्रेंडलिस्ट छोटी करण्याच्या माझ्या अतिरेकी प्रोजेक्टमध्ये  माझ्या फ्रेंड लिस्टींतून काही फारच महत्वाच्या व्यक्ती कमी केल्या गेल्या त्यात त्याही असल्याने जो फेसबुकमधून संबंध यायचा तोही गेला त्यामुळे माझ्याजवळ त्यांच्या वैयक्तिक आठवणी नाहीतच पण कलेच्या पातळीवर मात्र मी त्यांच्या सर्व हिकमतींच्या कडे लक्ष्य ठेवून होता मला व्यक्तिशः त्यांची ब्र ही कादंबरी फार महत्वाची वाटते नेमाडे ह्यांचा देशीवाद आणि अवचटांचा खास मराठी डॉक्युमेंटेशनचा सामाजिक अवतार ह्यांच्या दरम्यान दोन्हीचा समतोल साधणारा एक वास्तववाद आहे ज्याला द्वंद्वात्मक वास्तववाद म्हणता येईल  ज्याची परिवर्तनवादाशी घट्ट नाळ आहे मराठीत दीनानाथ मनोहर , प्रभाकर पेंढारकर , विलास मनोहर ह्यांसारख्या कादंबरीकारांनी तो विकसित केला आणि कविता महाजन ह्या ह्या कुळातील हा वास्तववाद विकसित करण
अस्ताचं युग आणि नवनिर्माणाचे प्रयत्न श्रीधर तिळवे नाईक  मी नागेशी बांदिवड्याचा आहे किंवा कोल्हापूरचा आहे म्हणजे काय आहे ह्या प्रश्नाने माझा न्यू कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यापासून सतत   पाठलाग केला आहे १९८० ते १९८७   हा माझा कालखंड मोक्ष आणि त्यासाठी स्वतःचे संस्कारण म्हणजे कंडिशनिंग तपासणारा आणि तासणारा कालखंड आहे माझ्या मिलिंद गुर्जर , जयसिंग पाटील , बाळकृष्ण शिर्के , महेश पुसाळकर , विश्वजित जाधव , अजय कोंडेकर , शरावती यादव ,  श्रीराम पचिंद्रे , राजकुमार यादव , निनाद काळे , विलास कांबळे , शेखर जाधव , काशिनाथ मंगल , श्रीनिवास एकसंबेकर , अवधूत भट , विजय पवार अशा अनेक कलावंत वा कलासक्त मित्रांना त्याकाळात कोल्हापूरने भारावून टाकले होते आणि जवळपास दिवसातून एकदा महाद्वार रोडला    किंवा रंकाळ्याला    गेल्याशिवाय दिवस सफल झालाय असं आम्हाला वाटत न्हवते एक अस्तंगत चाललेले कोल्हापूर शेवटचे नागरिक म्हणून जणूकाही आम्ही आमच्या डोळ्यात साठवून घेत होतो हे कोल्हापूर शाहू महाराजांच