युवल हरारीवर विश्वास आहे ना तुमचा ? मग सगळंच फिक्शन आहे अर्थव्यवस्थाही फिक्शन आणि हिंदुत्वही फिक्शन ! आता लोकांनी हिंदुत्व हे फिक्शन निवडलं तर बोंबा कशाला मारता ? आमचं स्पष्ट आहे . युवल हरारी हाच मुळात फिक्शनचा बळी आहे हे असे बळी अधूनमधून उगवत असतात आणि अतिशहाणे लोक त्यांना अटेंड करायला जात असतात क्वान्टम फिजिक्सचीही फोडणी देता येते काहीजणांनां असो ते हरारीन भारतात येण्याचे किती पैसे घेतले कि ते फिक्शन म्हणून सोडून दिले ? श्रीधर तिळवे नाईक
Posts
Showing posts from June, 2019
- Get link
- Other Apps
श्रीधर तिळवे ह्यांची राहुल सरवटे ह्यांनी घेतलेली मुलाखत 2006 परममित्र २००६ भाग १ श्रीधर तिळवे आजच्या काळातला महत्वाचा , समर्थ , आणि सशक्त कवी आहे . ही ओळख मुख्यतः अपुरी असेल जर त्यांच्या radical समीक्षात्मक / दा र्शनिक मांडणी कडे दुर्लक्ष आपण करत असू . श्रीधरची मोक्षप्रद प्रतिभा टीकाहरण सारख्या संहितेत प्रखरपणे व्यक्त झाली आहे . तितकीच ती कव्ही किंवा स्त्री - वाहिनी सारख्या संग्रहातून झालीय . सगळ्या साहित्यातून व्यक्त झालेली आणि जे समजून घ्यायला दिशादर्शक ठरणारी त्यांची समक्षता ( जी त्यांच्या जीवनव्यवहाराहून आणि जीवनदर्शनाहून अलिप्त कधीच र हात नाही existential quotient मध्ये मुरल्यासारखी ) ही सर्वमान्य मराठी समीक्षेहून मूलतः भिन्न आहे , आणि तिला नवं वळण देणारी आहे . श्रीधरच्याच मते , संहिता / समीक्षा वैयक्तिक नसून open forum सारखी