नवता :सर्जक , सर्जन, व्यवस्थापक आणि व्यवस्थापन श्रीधर तिळवे नाईक
कुठलीही नवता फक्त निर्माण होऊन चालत नाही तिला चांगल्या व्यवस्थापनाचीही गरज असते कलाक्षेत्रात व्यवस्थापन हे फार संवेदनशीलतेने करावे लागते हे व्यवस्थापन सत्तेचे राजकारण खेळायला लागले आणि हुकूमशहा बनून छाताडावर नाचायला लागले कि त्या नवतेची वाट लागते
मराठीत प्रबोधनवादी नवतेचे सर्जन महात्मा फुल्यांनी केले पण ह्या नवतेला चांगला व्यवस्थापकच लाभला नाही आणि प्रबोधनवाद मराठी साहित्यात नीट उमटलाच नाही साधं फुल्यांचं नाटक सुद्धा ह्या लोकांनी सादर केलं नाही त्याउलट केशवसुतांनी स्वछंदवादी नवतेचे सर्जन मर्यादित कुवतेनुसार केले आणि त्याचे व्यवस्थापन हे ब्राम्हणी परिघात घुटमळत राहिले वास्तविक ह्या नवतेला सावरकरांच्यासारखा क्रांतिकारक माणूस लाभला होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेलाच नाही बालकवी आणि गडकरी ह्या उत्तम सर्जकांनी चांगले काम केले १९३० नंतर मात्र अचानक ह्या नवतेत एकापेक्षा एक दिग्गज कवी नाटककार निर्माण झाले आणि ही नवता बहरली कुसुमाग्रज बा भ बोरकर पु शि रेगे बहिणाबाई चौधरी ना घ देशपांडे पु ल देशपांडे आचार्य अत्रे ही ठळक नावे तिसरी फळी आली तीही दमदार ना धो महानोर ग्रेस आरती प्रभू लोकांचाच पाठिंबा असल्याने हिला व्यवस्थापनाची गरजच भासली नाही
व्यवस्थापनाची खरी गरज भासली ती आधुनिकतावादी नवतेला ! मर्ढेकरांनी आपला सर्जकाचा रोल उत्तम निभावला तर पुरुषोत्तम चित्रेंनी अभिरुचीद्वारा उत्तम व्यवस्थापन केले पुढे ह्या नवतेचे व्यवस्थापन केले ते श्री पु भागवत ह्यांनी त्यांनीच ह्या नवतेचा व्यवस्थापकीय प्रपंच नेटका उभा केला मात्र प्रतिमावाद हा आधुनिकतावादी चळवळीचा अनेक वादांपैकी केवळ एक वाद होता ह्याचाच त्यांना विसर पडला स्वतःच्या मनमानीने त्यांनी ही चळवळ फारच संकुचित केली आणि व्यवस्थापन सर्जनावर हावी झाले प्रतिमावादी चि त्र्यं खानोलकर जी ए कुलकर्णी ग्रेस ह्यांना मेन ट्रेंड बनवण्यात ह्या व्यवस्थापनाचा बराच हात होता त्यामुळे आधुनिकतावादी असूनही अस्तित्ववादी विलास सारंगही मागे पडले ह्यांचेच असूनही ! गोतावळा प्रतिमावादीही वाटत असल्याने प्रमोट केली गेली पण प्रतिमावादातून वास्तववादाकडे आणि नंतर फुलेवादाकडे वळलेले आनंद यादव नकोसे झाले आणि झोंबी मौजेबाहेरून आली
देशीवादी नवतेत सर्जक आणि व्यवस्थापक ह्या सीमारेषा अंधुक झाल्या आणि सर्जकांनी व्यवस्थापन न सांभाळता धडाक्याने पुस्तके काढली उदा नेमाडेंनी काढलेले चित्र्यांचे पुस्तक कवितेनंतरच्या कविता अपवाद अशोक शहाणे खरेतर अशोक शहाण्यांनी आपला व्यवस्थापकीय रोल अधिक नीट ओळखायला हवा होता आणि वर्षातून किमान चार पुस्तके काढायला हवी होती पण टाईमपास जास्त झाला आणि कोसलासारखी कादंबरी देशमुखीनंतर पॉप्युलर प्रकाशनासारख्या अतिशय उमद्या व्यवस्थापनाकडे गेली आणि ते बरेच झाले कारण अरुण कोलटकरांच्या कविता आणि गद्य काढायला शहाण्यांनी जो उशीर केला तो बघता कोसलाही अशीच रेंगाळत आली असती साहित्य मठांच्याविरुद्ध बंड करण्याचा आव आणणाऱ्या अनियतकालिकांची चळवळ नंतर पॉप्युलर प्रकाशनाच्या व्यवस्थापनात विसर्जित व्हावी हा क्रांतीचे व्यवस्थापन बोंबलले कि काय होते त्याचा नमुनाच म्हंटला पाहिजे मात्र साठोत्तरी व्यवस्थापनाने विशेषतः अशोक शहाण्यांनी मराठी पुस्तकांचा चेहरा बदलला हे मान्यच करावे लागले
चौथ्या नवतेचे आम्ही जेव्हा साहित्यात आलो तेव्हा आमच्यापुढे तिसऱ्या नवतेच्या व्यवस्थापनाचे काय झाले ते समोर होते श्री पु भागवत व्हायचं नाही आणि अशोक शहाणेही हे पक्के होते विंदा करंदीकरांनी मला कविता पॉप्युलर किंवा मौजेला पाठव असा सल्ला दिला माझी ह्या काळातील अक्कल झिरो होती त्यामुळे कसलाही विचार न करता मी एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार पॉप्युलरला पाठवून दिला बहुदा १९८५ ८६ साली आणि कवी काळा कि गोरा हे माहीत नसतांना पॉप्युलरने तो ताबडतोब स्वीकारला मी हा सस्पेन्स बऱ्यापैकी सांभाळला होता पण राजन गवस ह्या आमच्या मित्राने तो कोल्हापुरात येऊन फोडला मला २१ व्या वर्षीच थेट पॉप्युलरमध्येच एंट्री मिळाल्याने माझ्या वाट्याला काही लेखकाचा संघर्ष बिंघर्ष आला नाही मात्र नवता पसरवण्यासाठी हे पुरेसे न्हवते पॉप्युलर प्रकाशन जसे तिसऱ्या नवतेमागे ठामपणे उभे राहिले तसे चौथ्या नवतेमागे राहिले नाही आणि ही आपली चूक आहे हेही ह्या प्रकाशनाला कधी कळले नाही त्यामुळे आपल्याला चौथ्या नवतेचा प्लॅटफॉर्म उभे करणे गरजेचे आहे हे कळून चुकले १९९० पासून ह्या अंगाने माझ्या जे एस हॉल हॉस्टेलला आणि रूईयाच्या कट्ट्यावर अनेकांशी मिटींगा व्हायला लागल्या भालचंद्र कुबल हा माझा त्यावेळचा परम मित्र आशुतोष आपटे संजय सावंत संतोष क्षीरसागर हे चित्रकार मित्र व त्यांची जेजे गॅंग शेखर सरतांडेल गजेंद्र अहिरे निशिकांत कामत अभिजित पानसे ज्ञानदा समीर परांजपे मंगेश सोमण हे रुईयायिट असा त्यावेळचा माझा मित्रपरिवार होता ह्यातून चित्र स्पष्ट होत गेले आणि मी सर्जकाचा संपादकाचा आणि भालचंद्र कुबलने प्रकाशक व्यवस्थापकाचा रोल पार पाडायचा असे ठरले पुढे चंदू हा जयराज साळगावकरांचा मित्र असल्याने जयराजही ह्यात पुढे आला आणि सौष्ठवचा पहिला अंक आम्ही दणक्यात प्रकाशित केला कालनिर्णयने तो मस्त छापला होता ह्या अंकानेच प्रभावित होऊन एक तरुण पुढे आला त्याचे नाव हेमंत दिवटे ज्याला साहित्यात काहीतरी करायचे होते पण काय करायचे हे स्पष्ट न्हवते तो आता काहीही म्हणत असला तरी चौथ्या नवतेतलं त्याला शस्पही माहित न्हवते मात्र उत्साह भरपूर होता त्याच्या माझ्या मीटिंगमध्ये मी सर्जक आणि त्याने व्यवस्थापक अशी जबाबदारी वाटून घ्यायची ठरली आणि माझ्या मते ही एक चांगली जोडी होती आणि तिने आपले काम चोखपणे पार पाडले पुढे माझ्या कवितेमुळे जी केस झाली त्याने चित्र बदलले आणि उत्तरोत्तर राजकारणही वाढत गेले पण मी सर्जनाच्या अंगाने आणि हेमंत व्यवस्थापनाच्या अंगाने वाढत गेला दुर्देवाने इथे श्री पु भागवत नव्याने जन्मला आणि त्याने सर्वांनाच आपल्या कानाच्या खाली उभे करायला सुरवात केली ज्यांची उंचीच कमी होती ते थांबले आणि चमचे झाले ज्यांची जास्त होती ते बाहेर पडले
ह्यानंतरची पिढी हा सर्जक व्यवस्थापक प्रकार कसा पेलतीये हा प्रश्न आहे मुळात ह्या पिढीत असा काही प्लॅटफॉर्म का तयार झाला नाही जो नवी संवेदनशीलता प्रकट करेल वास्तविक मेघना भुस्कुटे आणि अभिजित रणदिवे ह्यांनी फार छान सुरवात केली पण घोडे नेमके कुठे पेंड खायला लागले ? नितीन वाघ कायतरी करतील असे वाटले होते त्यांचे काय झाले ? कि मुळात फेसबुक मीटिंग मेटींग आणि मेल्टिंग स्पॉट असल्याने अशा काही प्लॅटफॉर्मची गरजच उरलेली नाही ?कि प्रत्येकाचे इगो आडवे येतायत ?
ह्या पिढीचा एक चेहरा तयार झाला आहे काय ही पिढी आमच्या पिढीपेक्षा खरोखर कुठे वेगळी आहे त्याची मांडणी नेमकी कोण आणि कधी करणार ? ह्यांनी नव्वदोत्तर पिढी मुळात समग्र वाचायचा साधा प्रयत्न तरी केलाय का ? आम्ही हेलपाटे टाकून साठोत्तरी लेखन कमावले तसं ह्यांनी काही केलं का ? कि होम डिलिव्हरीची सवय झाल्याने ह्यांना सगळ्या क्रिएटिव्ह लेखनाचीही होम डिलिव्हरी हवी आहे ? माझा अनुभव असा कि हेही साठोत्तरीच्या मागे लागले हे म्हणजे आमच्या पिढीने मर्ढेकरांच्या नादाला लागण्यासारखं होतं त्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि नव्वोदत्तरी पण साठोत्तरी च्या प्रभावाखाली आणि ही पिढीही ! ह्या पिढीने केलेल्या अनेक गोष्टी तुमच्या पिढीच्या आधीच कुणी केल्या असल्या तर ह्या पिढीला त्याचं श्रेय मिळणे अवघड आहे लेखनाला मान्यता मिळवण्याचा जो आटापिटा नव्वोदत्तरी पिढीने केला त्याच्या झाश्यात हे पण आलेत काय आणि त्या नादात आता स्वतःच्या क्रिएटिव्ह प्रोसेसकडे ही पिढी दुर्लक्ष्य करत आहे काय ?
पुढच्या पिढीचे कौतुक करून त्यांना सोकावून ठेवणारे साहित्यिक प्रत्येक पिढीत असतात त्याने काहीच फायदा होत नाही मुळात संपूर्ण जागतिक काव्यक्षेत्रातच एक प्रकारची मरगळ आहे मी माझे समकालीन युरोपियन अमेरिकन वाचतो तेव्हा फार ग्रेट कविता वाचतोय असं मला वाटत नाही आमच्या पिढीतले खरे कवी सर्वत्रच झाकले गेले असं दिसतंय आणि सर्वत्रच साठोत्तरीने पुढच्या पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो त्यातून फक्त तेच वाचलेत ज्यांनी मान्यतेचा टिळा लावायला नकार दिला एक मात्र खरे जोवर सर्जन आणि व्यवस्थापन ह्यांचा समतोल कसा साधायचा हे ह्या पिढीला स्पष्टपणे कळणार नाही तोवर ह्या पिढीचे साहित्य एक क्रिएटिव्ह चळवळ म्हणून उभे राहणे कठीण आहे आऊटडेटेड लोकांच्या मान्यता तुम्हाला अपडेट करत नाहीत त्या तुम्हांलाही ऑऊटडेटेड करत जातात धिस इज द हाय टाइम टू रिअलाईझ इट .
श्रीधर तिळवे नाईक
मी काय घडलं ते वस्तुनिष्ठ पद्धतीने सांगितले आहे सौष्ठवचा चौथ्या नवतेचा अंक आला तेव्हा त्याचवेळी हेमंत दिवटेंचा अभिधाचा अंक आला होता आणि तो चक्क सुरेश भट ह्यांच्यावरचा गझल विशेषांक होता आता हे ऐतिहासिक सत्य तुम्ही मारे सैद्धांतिक मांडणी केली म्हणून थोडेच बदलणार आहे ? इतिहास पुरावे बघतो आणि मागतो प्रत्येकवेळी अनेक लोकांनी सृजनशीलता दाखवली असं सिद्ध करता येईल का आजही कित्येक सिद्धांत किंवा शोध एका व्यक्तीने लावले आहेत विज्ञानातील सारीच नोबल अनेकांना विभागून देण्यात आलेली नाहीत कधीकधी ती एकालाच द्यावी लागलेत सत्य काय हे सर्वात महत्वाचं आहे उद्या मी चुकीचा आहे असं कुणी सिद्ध केलं तर माझी काही ना नाही मुद्दा सत्यतेचा आहे कृपया हे लक्ष्यात घ्यावे आपण कोल्हापूरचे आहात म्हणून सांगतो त्यावेळी शंकर सारडांनी पुढारीत ह्या अंकावर एक विशेष लेख लिहिला होता
कुठलीही नवता फक्त निर्माण होऊन चालत नाही तिला चांगल्या व्यवस्थापनाचीही गरज असते कलाक्षेत्रात व्यवस्थापन हे फार संवेदनशीलतेने करावे लागते हे व्यवस्थापन सत्तेचे राजकारण खेळायला लागले आणि हुकूमशहा बनून छाताडावर नाचायला लागले कि त्या नवतेची वाट लागते
मराठीत प्रबोधनवादी नवतेचे सर्जन महात्मा फुल्यांनी केले पण ह्या नवतेला चांगला व्यवस्थापकच लाभला नाही आणि प्रबोधनवाद मराठी साहित्यात नीट उमटलाच नाही साधं फुल्यांचं नाटक सुद्धा ह्या लोकांनी सादर केलं नाही त्याउलट केशवसुतांनी स्वछंदवादी नवतेचे सर्जन मर्यादित कुवतेनुसार केले आणि त्याचे व्यवस्थापन हे ब्राम्हणी परिघात घुटमळत राहिले वास्तविक ह्या नवतेला सावरकरांच्यासारखा क्रांतिकारक माणूस लाभला होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेलाच नाही बालकवी आणि गडकरी ह्या उत्तम सर्जकांनी चांगले काम केले १९३० नंतर मात्र अचानक ह्या नवतेत एकापेक्षा एक दिग्गज कवी नाटककार निर्माण झाले आणि ही नवता बहरली कुसुमाग्रज बा भ बोरकर पु शि रेगे बहिणाबाई चौधरी ना घ देशपांडे पु ल देशपांडे आचार्य अत्रे ही ठळक नावे तिसरी फळी आली तीही दमदार ना धो महानोर ग्रेस आरती प्रभू लोकांचाच पाठिंबा असल्याने हिला व्यवस्थापनाची गरजच भासली नाही
व्यवस्थापनाची खरी गरज भासली ती आधुनिकतावादी नवतेला ! मर्ढेकरांनी आपला सर्जकाचा रोल उत्तम निभावला तर पुरुषोत्तम चित्रेंनी अभिरुचीद्वारा उत्तम व्यवस्थापन केले पुढे ह्या नवतेचे व्यवस्थापन केले ते श्री पु भागवत ह्यांनी त्यांनीच ह्या नवतेचा व्यवस्थापकीय प्रपंच नेटका उभा केला मात्र प्रतिमावाद हा आधुनिकतावादी चळवळीचा अनेक वादांपैकी केवळ एक वाद होता ह्याचाच त्यांना विसर पडला स्वतःच्या मनमानीने त्यांनी ही चळवळ फारच संकुचित केली आणि व्यवस्थापन सर्जनावर हावी झाले प्रतिमावादी चि त्र्यं खानोलकर जी ए कुलकर्णी ग्रेस ह्यांना मेन ट्रेंड बनवण्यात ह्या व्यवस्थापनाचा बराच हात होता त्यामुळे आधुनिकतावादी असूनही अस्तित्ववादी विलास सारंगही मागे पडले ह्यांचेच असूनही ! गोतावळा प्रतिमावादीही वाटत असल्याने प्रमोट केली गेली पण प्रतिमावादातून वास्तववादाकडे आणि नंतर फुलेवादाकडे वळलेले आनंद यादव नकोसे झाले आणि झोंबी मौजेबाहेरून आली
देशीवादी नवतेत सर्जक आणि व्यवस्थापक ह्या सीमारेषा अंधुक झाल्या आणि सर्जकांनी व्यवस्थापन न सांभाळता धडाक्याने पुस्तके काढली उदा नेमाडेंनी काढलेले चित्र्यांचे पुस्तक कवितेनंतरच्या कविता अपवाद अशोक शहाणे खरेतर अशोक शहाण्यांनी आपला व्यवस्थापकीय रोल अधिक नीट ओळखायला हवा होता आणि वर्षातून किमान चार पुस्तके काढायला हवी होती पण टाईमपास जास्त झाला आणि कोसलासारखी कादंबरी देशमुखीनंतर पॉप्युलर प्रकाशनासारख्या अतिशय उमद्या व्यवस्थापनाकडे गेली आणि ते बरेच झाले कारण अरुण कोलटकरांच्या कविता आणि गद्य काढायला शहाण्यांनी जो उशीर केला तो बघता कोसलाही अशीच रेंगाळत आली असती साहित्य मठांच्याविरुद्ध बंड करण्याचा आव आणणाऱ्या अनियतकालिकांची चळवळ नंतर पॉप्युलर प्रकाशनाच्या व्यवस्थापनात विसर्जित व्हावी हा क्रांतीचे व्यवस्थापन बोंबलले कि काय होते त्याचा नमुनाच म्हंटला पाहिजे मात्र साठोत्तरी व्यवस्थापनाने विशेषतः अशोक शहाण्यांनी मराठी पुस्तकांचा चेहरा बदलला हे मान्यच करावे लागले
चौथ्या नवतेचे आम्ही जेव्हा साहित्यात आलो तेव्हा आमच्यापुढे तिसऱ्या नवतेच्या व्यवस्थापनाचे काय झाले ते समोर होते श्री पु भागवत व्हायचं नाही आणि अशोक शहाणेही हे पक्के होते विंदा करंदीकरांनी मला कविता पॉप्युलर किंवा मौजेला पाठव असा सल्ला दिला माझी ह्या काळातील अक्कल झिरो होती त्यामुळे कसलाही विचार न करता मी एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार पॉप्युलरला पाठवून दिला बहुदा १९८५ ८६ साली आणि कवी काळा कि गोरा हे माहीत नसतांना पॉप्युलरने तो ताबडतोब स्वीकारला मी हा सस्पेन्स बऱ्यापैकी सांभाळला होता पण राजन गवस ह्या आमच्या मित्राने तो कोल्हापुरात येऊन फोडला मला २१ व्या वर्षीच थेट पॉप्युलरमध्येच एंट्री मिळाल्याने माझ्या वाट्याला काही लेखकाचा संघर्ष बिंघर्ष आला नाही मात्र नवता पसरवण्यासाठी हे पुरेसे न्हवते पॉप्युलर प्रकाशन जसे तिसऱ्या नवतेमागे ठामपणे उभे राहिले तसे चौथ्या नवतेमागे राहिले नाही आणि ही आपली चूक आहे हेही ह्या प्रकाशनाला कधी कळले नाही त्यामुळे आपल्याला चौथ्या नवतेचा प्लॅटफॉर्म उभे करणे गरजेचे आहे हे कळून चुकले १९९० पासून ह्या अंगाने माझ्या जे एस हॉल हॉस्टेलला आणि रूईयाच्या कट्ट्यावर अनेकांशी मिटींगा व्हायला लागल्या भालचंद्र कुबल हा माझा त्यावेळचा परम मित्र आशुतोष आपटे संजय सावंत संतोष क्षीरसागर हे चित्रकार मित्र व त्यांची जेजे गॅंग शेखर सरतांडेल गजेंद्र अहिरे निशिकांत कामत अभिजित पानसे ज्ञानदा समीर परांजपे मंगेश सोमण हे रुईयायिट असा त्यावेळचा माझा मित्रपरिवार होता ह्यातून चित्र स्पष्ट होत गेले आणि मी सर्जकाचा संपादकाचा आणि भालचंद्र कुबलने प्रकाशक व्यवस्थापकाचा रोल पार पाडायचा असे ठरले पुढे चंदू हा जयराज साळगावकरांचा मित्र असल्याने जयराजही ह्यात पुढे आला आणि सौष्ठवचा पहिला अंक आम्ही दणक्यात प्रकाशित केला कालनिर्णयने तो मस्त छापला होता ह्या अंकानेच प्रभावित होऊन एक तरुण पुढे आला त्याचे नाव हेमंत दिवटे ज्याला साहित्यात काहीतरी करायचे होते पण काय करायचे हे स्पष्ट न्हवते तो आता काहीही म्हणत असला तरी चौथ्या नवतेतलं त्याला शस्पही माहित न्हवते मात्र उत्साह भरपूर होता त्याच्या माझ्या मीटिंगमध्ये मी सर्जक आणि त्याने व्यवस्थापक अशी जबाबदारी वाटून घ्यायची ठरली आणि माझ्या मते ही एक चांगली जोडी होती आणि तिने आपले काम चोखपणे पार पाडले पुढे माझ्या कवितेमुळे जी केस झाली त्याने चित्र बदलले आणि उत्तरोत्तर राजकारणही वाढत गेले पण मी सर्जनाच्या अंगाने आणि हेमंत व्यवस्थापनाच्या अंगाने वाढत गेला दुर्देवाने इथे श्री पु भागवत नव्याने जन्मला आणि त्याने सर्वांनाच आपल्या कानाच्या खाली उभे करायला सुरवात केली ज्यांची उंचीच कमी होती ते थांबले आणि चमचे झाले ज्यांची जास्त होती ते बाहेर पडले
ह्यानंतरची पिढी हा सर्जक व्यवस्थापक प्रकार कसा पेलतीये हा प्रश्न आहे मुळात ह्या पिढीत असा काही प्लॅटफॉर्म का तयार झाला नाही जो नवी संवेदनशीलता प्रकट करेल वास्तविक मेघना भुस्कुटे आणि अभिजित रणदिवे ह्यांनी फार छान सुरवात केली पण घोडे नेमके कुठे पेंड खायला लागले ? नितीन वाघ कायतरी करतील असे वाटले होते त्यांचे काय झाले ? कि मुळात फेसबुक मीटिंग मेटींग आणि मेल्टिंग स्पॉट असल्याने अशा काही प्लॅटफॉर्मची गरजच उरलेली नाही ?कि प्रत्येकाचे इगो आडवे येतायत ?
ह्या पिढीचा एक चेहरा तयार झाला आहे काय ही पिढी आमच्या पिढीपेक्षा खरोखर कुठे वेगळी आहे त्याची मांडणी नेमकी कोण आणि कधी करणार ? ह्यांनी नव्वदोत्तर पिढी मुळात समग्र वाचायचा साधा प्रयत्न तरी केलाय का ? आम्ही हेलपाटे टाकून साठोत्तरी लेखन कमावले तसं ह्यांनी काही केलं का ? कि होम डिलिव्हरीची सवय झाल्याने ह्यांना सगळ्या क्रिएटिव्ह लेखनाचीही होम डिलिव्हरी हवी आहे ? माझा अनुभव असा कि हेही साठोत्तरीच्या मागे लागले हे म्हणजे आमच्या पिढीने मर्ढेकरांच्या नादाला लागण्यासारखं होतं त्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि नव्वोदत्तरी पण साठोत्तरी च्या प्रभावाखाली आणि ही पिढीही ! ह्या पिढीने केलेल्या अनेक गोष्टी तुमच्या पिढीच्या आधीच कुणी केल्या असल्या तर ह्या पिढीला त्याचं श्रेय मिळणे अवघड आहे लेखनाला मान्यता मिळवण्याचा जो आटापिटा नव्वोदत्तरी पिढीने केला त्याच्या झाश्यात हे पण आलेत काय आणि त्या नादात आता स्वतःच्या क्रिएटिव्ह प्रोसेसकडे ही पिढी दुर्लक्ष्य करत आहे काय ?
पुढच्या पिढीचे कौतुक करून त्यांना सोकावून ठेवणारे साहित्यिक प्रत्येक पिढीत असतात त्याने काहीच फायदा होत नाही मुळात संपूर्ण जागतिक काव्यक्षेत्रातच एक प्रकारची मरगळ आहे मी माझे समकालीन युरोपियन अमेरिकन वाचतो तेव्हा फार ग्रेट कविता वाचतोय असं मला वाटत नाही आमच्या पिढीतले खरे कवी सर्वत्रच झाकले गेले असं दिसतंय आणि सर्वत्रच साठोत्तरीने पुढच्या पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो त्यातून फक्त तेच वाचलेत ज्यांनी मान्यतेचा टिळा लावायला नकार दिला एक मात्र खरे जोवर सर्जन आणि व्यवस्थापन ह्यांचा समतोल कसा साधायचा हे ह्या पिढीला स्पष्टपणे कळणार नाही तोवर ह्या पिढीचे साहित्य एक क्रिएटिव्ह चळवळ म्हणून उभे राहणे कठीण आहे आऊटडेटेड लोकांच्या मान्यता तुम्हाला अपडेट करत नाहीत त्या तुम्हांलाही ऑऊटडेटेड करत जातात धिस इज द हाय टाइम टू रिअलाईझ इट .
श्रीधर तिळवे नाईक
मी काय घडलं ते वस्तुनिष्ठ पद्धतीने सांगितले आहे सौष्ठवचा चौथ्या नवतेचा अंक आला तेव्हा त्याचवेळी हेमंत दिवटेंचा अभिधाचा अंक आला होता आणि तो चक्क सुरेश भट ह्यांच्यावरचा गझल विशेषांक होता आता हे ऐतिहासिक सत्य तुम्ही मारे सैद्धांतिक मांडणी केली म्हणून थोडेच बदलणार आहे ? इतिहास पुरावे बघतो आणि मागतो प्रत्येकवेळी अनेक लोकांनी सृजनशीलता दाखवली असं सिद्ध करता येईल का आजही कित्येक सिद्धांत किंवा शोध एका व्यक्तीने लावले आहेत विज्ञानातील सारीच नोबल अनेकांना विभागून देण्यात आलेली नाहीत कधीकधी ती एकालाच द्यावी लागलेत सत्य काय हे सर्वात महत्वाचं आहे उद्या मी चुकीचा आहे असं कुणी सिद्ध केलं तर माझी काही ना नाही मुद्दा सत्यतेचा आहे कृपया हे लक्ष्यात घ्यावे आपण कोल्हापूरचे आहात म्हणून सांगतो त्यावेळी शंकर सारडांनी पुढारीत ह्या अंकावर एक विशेष लेख लिहिला होता
Comments
Post a Comment