सणकी लेखकाची डायरी ४ श्रीधर तिळवे नाईक चैत्र प्रथमा माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधीही माझ्या समकालीन लेखकांशी कधीही कसलीही स्पर्धा केली नाही किंबहुना समकालीन काळातल्या मला ठाऊक नसलेल्या आणि माझ्या शरीराचा ज्यांच्याशी संपर्क आला नाही अश्या अनेक गोष्टींचा साक्षात अनुभव व्यक्त करण्याऱ्या माझ्याच शरीराचे विस्ताररूप असण्याऱ्या मितिकांचा सजीव चैतन्यमयी समूह म्हणूनच मी त्यांच्याकडे पाहत आलेलो आहे मी आणि ते ह्यांच्यात अद्वैत आहे हा माझा अनुभव आहे आम्ही एका समान कालखंडाला सामोरे जात आहोत आणि आमची खरी स्पर्धा ह्या कालखंडाशी आहे त्यातल्या सर्व गोष्टी आम्ही चिन्हसृष्टीत ओतू शकतो का हा खरा प्रश्न आहे चिन्हसृष्टी हे आमचे तोंड आहे आणि आम्ही ह्या तोंडांच्या साहाय्याने आमचा काळखंड गिळतो आहोत काळ अनंत अवकाशक्षणांनी येतो आणि माझ्या शरीराला त्यातील फक्त एक अवकाशक्षण येतो ह्या अवकाशक्षणातील काहींच्या कविता होतात कांदंबऱ्या होतात . जितके लोक तितके अवकाशक्षण ! अब्जावधी ! आणि प्रत्येक क्षणी त्यातील फक्त एक अवकाशक्षण माझा !एक सचिन केतकरांचा ! एक सलील वाघाचा !एक अभिजित देशपांडेचा ! एक मनोज जोशींचा...
Posts
Showing posts with the label सणकी लेखकाची डायरी ४ श्रीधर तिळवे नाईक