सौष्ठवला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून लेख तिसरा
सतीश तांबे ह्यांनी मी चौथी नवता इथे मांडावी अशी सूचना केली होती त्यांच्या सूचनेचा मान ठेऊन इथे जास्तीत जास्त सुलभ भाषेत चौथी नवता म्हणजे काय ते मांडत आहे .
सौष्ठवची भूमिका काय होती ?
१ सौष्ठवच्या मते मानवी जीवनात चौथी नवता ही अटळ गोष्ट आहे आणि तिचे मूळ पाश्चात्य देशात आधीच घातले गेले होते पाश्च्यात्य देशातील सर्व उत्तरवादी चळवळी आणि थर्ड वेववादी चळवळींनी ह्याचे बीज घातले होते जसे ह्या उत्तरवादी चळवळी आणि थर्ड वेववादी चळवळींचे मूळ आधीच्या मॉडर्न मुव्हमेंटमध्ये होते भारतातील देशीवादी चळवळी आणि सबाल्टर्न चळवळी ह्या मात्र परंपरा आणि आधुनिकतेतच घुटमळत राहिल्याने ह्या समाजाला पुढे घेऊन जाण्याऐवजी मागे घेऊन जाणाऱ्या ठरल्या आज ना उद्या ह्या चळवळी भारतातल्या हिंदुत्ववादी आणि मुसलमानवादी चळवळींना मदत करणार आहेत आणि ह्यांचा देशीवाद हा अंतिमतः हिंदुत्ववाद आणि शरीयतवाद ह्यांचे रूप घेणार आहे . म्हणूनच देशीवादाचा पाडाव करणे हे अत्यंत आवश्यक कार्य आहे
२ देशीवाद स्वतःला कितीही पुरोगामी म्हणत असला तरी प्रत्यक्षात तो वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था ह्यांचे समर्थन करतो त्यामुळे सर्वांनी विशेषतः ओबीसी , स्त्रिया, दलित आणि आदिवासी ह्या सर्वांनी त्याचा पाडावंच केला पाहिजे
३ शिव , बुद्ध ,महावीर ,चार्वाक , मौर्य , सातवाहन , गुप्त , वर्धन , बसवेश्वर , शिवाजी महाराज , प्रथम बाजीराव , यशवंतराव होळकर , रामकृष्ण परमहंस , विवेकानंद , शाहू महाराज , फुले , नारायण गुरु , पेरियार , आंबेडकर , महात्मा गांधी आणि बिरसा मुंडा ह्यांची पूजा करण्याऐवजी त्यांची तार्किक चिकित्सा करून परिवर्तनवादी विचार नव्या काळाला अनुरूप पद्धतीने घडवला पाहिजे . वेळप्रसंगी त्यांचे जिथे चुकले आहे ते खुल्या दिलाने मान्य करून ते कसे दुरुस्त करता येईल ते पाहिले पाहिजे .
४ . लेखक फक्त स्वतःच्या भूमीत राहून नाही तर पृथ्वीवर उभे राहून लेखन करतो आणि देश न्हवे तर अवकाश आणि काळ ह्यांच्च्यात वावरत असतो अवकाश हा जितका रिअल असतो तितकाच तो डिजिटल असतो चिन्हसृष्टीय असतो
५मानवी समुदायता ही प्रथम निसर्गीय मग वैश्विक मग सृष्टीय मग प्रतिसृष्टीय अश्या तऱ्हेने अपडेट होत गेली आणि तिचे लेटेस्ट अपडेट व्हर्जन चिन्हसृष्टी आहे आणि ती टीव्ही संगणक लॅपटॉप इंटरनेट वैग्रे अनेक सेमिऑडिटीजद्वारा ती चिंक्रान्त होत आहे स्मार्टफोन , टॅब्लेट्स , फेसबुक वैग्रे आत्ताच्या सेमिऑडिटीज ! चिन्हसृष्टी सर्वच कमोडिटीजचे रूपांतर सेमिऑडिटीजमध्ये करत चालली आहे आणि तिचे अंतिम सेमिऑडिटींक रूप मानवी क्लोन आणि क्लोनड ब्रह्माण्ड आहे जे साध्य करण्याच्या दिशेने तिचे अपडेटीकरण होत चालले आहे
सतीश तांबे ह्यांनी मी चौथी नवता इथे मांडावी अशी सूचना केली होती त्यांच्या सूचनेचा मान ठेऊन इथे जास्तीत जास्त सुलभ भाषेत चौथी नवता म्हणजे काय ते मांडत आहे .
सौष्ठवची भूमिका काय होती ?
१ सौष्ठवच्या मते मानवी जीवनात चौथी नवता ही अटळ गोष्ट आहे आणि तिचे मूळ पाश्चात्य देशात आधीच घातले गेले होते पाश्च्यात्य देशातील सर्व उत्तरवादी चळवळी आणि थर्ड वेववादी चळवळींनी ह्याचे बीज घातले होते जसे ह्या उत्तरवादी चळवळी आणि थर्ड वेववादी चळवळींचे मूळ आधीच्या मॉडर्न मुव्हमेंटमध्ये होते भारतातील देशीवादी चळवळी आणि सबाल्टर्न चळवळी ह्या मात्र परंपरा आणि आधुनिकतेतच घुटमळत राहिल्याने ह्या समाजाला पुढे घेऊन जाण्याऐवजी मागे घेऊन जाणाऱ्या ठरल्या आज ना उद्या ह्या चळवळी भारतातल्या हिंदुत्ववादी आणि मुसलमानवादी चळवळींना मदत करणार आहेत आणि ह्यांचा देशीवाद हा अंतिमतः हिंदुत्ववाद आणि शरीयतवाद ह्यांचे रूप घेणार आहे . म्हणूनच देशीवादाचा पाडाव करणे हे अत्यंत आवश्यक कार्य आहे
२ देशीवाद स्वतःला कितीही पुरोगामी म्हणत असला तरी प्रत्यक्षात तो वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था ह्यांचे समर्थन करतो त्यामुळे सर्वांनी विशेषतः ओबीसी , स्त्रिया, दलित आणि आदिवासी ह्या सर्वांनी त्याचा पाडावंच केला पाहिजे
३ शिव , बुद्ध ,महावीर ,चार्वाक , मौर्य , सातवाहन , गुप्त , वर्धन , बसवेश्वर , शिवाजी महाराज , प्रथम बाजीराव , यशवंतराव होळकर , रामकृष्ण परमहंस , विवेकानंद , शाहू महाराज , फुले , नारायण गुरु , पेरियार , आंबेडकर , महात्मा गांधी आणि बिरसा मुंडा ह्यांची पूजा करण्याऐवजी त्यांची तार्किक चिकित्सा करून परिवर्तनवादी विचार नव्या काळाला अनुरूप पद्धतीने घडवला पाहिजे . वेळप्रसंगी त्यांचे जिथे चुकले आहे ते खुल्या दिलाने मान्य करून ते कसे दुरुस्त करता येईल ते पाहिले पाहिजे .
४ . लेखक फक्त स्वतःच्या भूमीत राहून नाही तर पृथ्वीवर उभे राहून लेखन करतो आणि देश न्हवे तर अवकाश आणि काळ ह्यांच्च्यात वावरत असतो अवकाश हा जितका रिअल असतो तितकाच तो डिजिटल असतो चिन्हसृष्टीय असतो
५मानवी समुदायता ही प्रथम निसर्गीय मग वैश्विक मग सृष्टीय मग प्रतिसृष्टीय अश्या तऱ्हेने अपडेट होत गेली आणि तिचे लेटेस्ट अपडेट व्हर्जन चिन्हसृष्टी आहे आणि ती टीव्ही संगणक लॅपटॉप इंटरनेट वैग्रे अनेक सेमिऑडिटीजद्वारा ती चिंक्रान्त होत आहे स्मार्टफोन , टॅब्लेट्स , फेसबुक वैग्रे आत्ताच्या सेमिऑडिटीज ! चिन्हसृष्टी सर्वच कमोडिटीजचे रूपांतर सेमिऑडिटीजमध्ये करत चालली आहे आणि तिचे अंतिम सेमिऑडिटींक रूप मानवी क्लोन आणि क्लोनड ब्रह्माण्ड आहे जे साध्य करण्याच्या दिशेने तिचे अपडेटीकरण होत चालले आहे
मराठी व भारतीय कला व साहित्यविश्वाला ह्याचे भान देणे हे गरजेचे आहे आणि सौष्ठव ह्या भानप्रक्रियेला वेगवान करण्यासाठी जन्माला घातले आहे
६ भारतीय इतिहास हा आतापर्यंत फक्त वैदिक , ब्राह्मणी , वैष्णव , हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन , पुरुषी , युरोपियन , अमेरिकन पद्धतीने लिहिला गेला असून तो आता शैव , जैन , बौद्ध , लिंगायत , शीख , स्त्रीय , जमातीय , आशियाई पद्धतीने लिहिला जाणे आवश्यक आहे . त्यातूनच पुढेमागे जगाचा खरा जागतिक इतिहास उदयाला येईल .
७ जागतिकीकरण समजून घ्यायचे असेल तर चिन्हसृष्टीकरण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे समजून घ्यायचे असेल तर मूलभूत गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे जागतिकीकरणामुळे चिन्हसृष्टी अस्तित्वात आलेली नसून चिन्हसृष्टीकरणामुळे जागतिकीकरण अस्तित्वात आले आहे . नव्वदोत्तरी पिढी जागतिकरणाचा ढोल पिटून मूळ सत्याचा अपलाप करत आहे . कॉलनीजमुळे व्यापारवाद (मर्चंटालिझम ) अस्तित्वात आला न्हवता तर व्यापारवादामुळे कॉलनीज अस्तित्वात आल्या त्याचप्रमाणे पुढे ह्या व्यापारवादाचे रूपांतर औद्योगिकवादात (इंडस्ट्रियालिझम ) झाल्यावर कॉलनीवादाचे (कलोनियालिझम ) रूपांतर साम्राज्यवादात झाले . ह्याचप्रमाणे चिन्हसृष्टिवादामुळे जागतिकीकरण अस्तित्वात आले असून त्याचा स्वीकार आपण विवेकाने आणि आपल्या टर्म्स आणि कण्डिशनवर केला पाहिजे . जागतिकीकरणाला आंधळा विरोध करणाऱ्या सर्व चळवळी ह्या कालबाह्य होत जाणे अटळ आहे त्यामुळेच देशीवाद आणि त्याचा जागतिकीकरणाला असलेला विरोध हा पुराण्या ब्राह्मण पंडितांनी औद्योगिकीकरणाला केलेल्या विरोधासारखा आहे तो आज ना उद्या जुनाट ठरणे अटळ आहे .
८ चिन्हसृष्टीकरणाला विरोध करणे आणि चिन्हसृष्टीकरणात माणसाची झालेली घुसमट व्यक्त करणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत . आधुनिक आणि उत्तराधुनिक कलेने औद्योगिक आणि उत्तरौद्योगिक जगातील माणसाची झालेली घुसमट आणि आनंदता व्यक्त केली चौथी नवता हीही चिन्हसृष्टीकरणातला नवा चिन्हमानव त्याची संवेदनशीलता , शरीरशिलता , बुद्धीशीलता वैग्रे आपल्या साहित्यात व कलेत सादर करते
६ भारतीय इतिहास हा आतापर्यंत फक्त वैदिक , ब्राह्मणी , वैष्णव , हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन , पुरुषी , युरोपियन , अमेरिकन पद्धतीने लिहिला गेला असून तो आता शैव , जैन , बौद्ध , लिंगायत , शीख , स्त्रीय , जमातीय , आशियाई पद्धतीने लिहिला जाणे आवश्यक आहे . त्यातूनच पुढेमागे जगाचा खरा जागतिक इतिहास उदयाला येईल .
७ जागतिकीकरण समजून घ्यायचे असेल तर चिन्हसृष्टीकरण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे समजून घ्यायचे असेल तर मूलभूत गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे जागतिकीकरणामुळे चिन्हसृष्टी अस्तित्वात आलेली नसून चिन्हसृष्टीकरणामुळे जागतिकीकरण अस्तित्वात आले आहे . नव्वदोत्तरी पिढी जागतिकरणाचा ढोल पिटून मूळ सत्याचा अपलाप करत आहे . कॉलनीजमुळे व्यापारवाद (मर्चंटालिझम ) अस्तित्वात आला न्हवता तर व्यापारवादामुळे कॉलनीज अस्तित्वात आल्या त्याचप्रमाणे पुढे ह्या व्यापारवादाचे रूपांतर औद्योगिकवादात (इंडस्ट्रियालिझम ) झाल्यावर कॉलनीवादाचे (कलोनियालिझम ) रूपांतर साम्राज्यवादात झाले . ह्याचप्रमाणे चिन्हसृष्टिवादामुळे जागतिकीकरण अस्तित्वात आले असून त्याचा स्वीकार आपण विवेकाने आणि आपल्या टर्म्स आणि कण्डिशनवर केला पाहिजे . जागतिकीकरणाला आंधळा विरोध करणाऱ्या सर्व चळवळी ह्या कालबाह्य होत जाणे अटळ आहे त्यामुळेच देशीवाद आणि त्याचा जागतिकीकरणाला असलेला विरोध हा पुराण्या ब्राह्मण पंडितांनी औद्योगिकीकरणाला केलेल्या विरोधासारखा आहे तो आज ना उद्या जुनाट ठरणे अटळ आहे .
८ चिन्हसृष्टीकरणाला विरोध करणे आणि चिन्हसृष्टीकरणात माणसाची झालेली घुसमट व्यक्त करणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत . आधुनिक आणि उत्तराधुनिक कलेने औद्योगिक आणि उत्तरौद्योगिक जगातील माणसाची झालेली घुसमट आणि आनंदता व्यक्त केली चौथी नवता हीही चिन्हसृष्टीकरणातला नवा चिन्हमानव त्याची संवेदनशीलता , शरीरशिलता , बुद्धीशीलता वैग्रे आपल्या साहित्यात व कलेत सादर करते
श्रीधर तिळवे नाईक
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------












Comments
Post a Comment